Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज पुरवठा बंद झाला तर…तातडीने फोन करा…

महावितरणचे आवाहन, आजपासून कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत

अहमदनगर/प्रतिनिधी ः महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचार्

पोलिसांनी वसूल केला 23 लाख रुपयांचा दंड
महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : खा. डॉ. सुजय विखे
टाकळी शाळेचा शताब्दीमहोत्सव उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचार्‍यांनी मंगळवार (3 जानेवारी) मध्यरात्री बारा वाजल्यापासून 6 जानेवारीपर्यत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या काळात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण आवश्यक काळजी घेत आहे. तरीही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435, 1800-233-3435, 1912 व 19120 यावर संपर्क साधावा. यासोबतच अहमदनगर मंडळातील ग्राहकांनी 8956620131 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे. दरम्यान, संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांसोबत उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या उपस्थितीत आज बुधवारी दि. 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. राज्यभरातील वीज कर्मचारी व अधिकारी यात सहभागी होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने आवश्यक तयारी केली आहे.

जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू – वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून हे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहेत. संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या काळात विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ज्याठिकाणी वीज साहित्याची आवश्यकता भासणार आहे, अशा ठिकाणी मंगळवारीच आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

त्यांच्यावर होणार कारवाई – कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत, अशा एजन्सींना तात्काळ बडतर्फ करण्याचेही निर्देश देण्यात आले असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

COMMENTS