Homeताज्या बातम्यादेश

शेतकरी राजधानीत रेल्वे, बसमधुन घुसणार

नवी दिल्ली ः किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच इतर म

सागरेश्‍वरमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बैठक; आंदोलन स्थगित
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादनहरितक्रांतीच्या जनकाला पुष्पहार अर्पण; मान्यवरांची उपस्थिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार! आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

नवी दिल्ली ः किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच इतर मागण्यांसाठी शेतकरी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. मात्र शेतकर्‍यांनी आता पुढील दिशा ठरवली असून, शेतकरी राजधानीमध्ये रेल्वे आणि बसमधून दाखल होणार आहेत. शेतकरी 10 मार्च रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन करणार आहेत. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले, पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवरून शेतकर्‍यांना पुढे सरकू दिले जात नाही. त्यामुळे 6 मार्च रोजी देशातील इतर राज्यांमधील शेतकरी बस आणि रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर सरकारविरोधात आंदोलन करतील. परंतु, पंजाबचे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरच आंदोलन करतील. शंभू आणि खनौरी सीमेवरील आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी आंदोलक शेतकर्‍यांची संख्या अधिक वाढवली जाणार आहे.

COMMENTS