Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आष्टी तालुक्यात आवकाळी पावसाचा बळी

अंगावर वीज पडून शेतकर्‍यासह दोन शेळ्यांचा मृत्यू

आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशा घेऊन

विषप्राशन करून दीर-भावजयने, भर रस्त्यात घट्ट मिठीत घेतला अखेरचा श्वास | LOKNews24
पेपर काढून घेतल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
तलवारींचा साठा आणणार्‍या चौघांना अटक | DAINIK LOKMNTHAN

आष्टी प्रतिनिधी – तालुक्यातील सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशा घेऊन बसलेल्या एका शेतकर्‍यांसह दोन शेळ्यांचा शनिवार दि.8 एप्रिल रोजी सायं.5 वा.अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.महादेव किसन गर्जे (वय -60) हे मयत शेतकर्‍यांचे नाव आहे.त्यामुळे आष्टीत आवकाळी पावसाने शेतकर्याच्या बळी घेतला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,महादेव किसन गर्जे हे शनिवार दि.8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा.च्या दरम्यान वादळी वार्‍यासह जोराचा पाऊस येऊ लागल्याने शेतात शेळया घेऊन चारण्यासाठी गेलेल्या विजेच्या कडकडाड व जोराचा पाऊस सुरू झाल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशाला बसले असता शेतकर्‍यांचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला तर दोन शेळ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती सुरुडीचे माजी सरपंच तथा दूध संघ व्हा.चेअरमन अशोक गर्जे यांनी दिली असता तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.गर्जे कुटुंबातील कर्ता पुरुषाचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाल्याने सुरुडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.शेतकर्यांनी काळजी घ्यावी-तहसिलदार सध्या तालुक्यात आवकाळी पावसाने थैमान घातले असून,शेतक-यांनी पावसात शेत जर असतील तर झाडाखाली थांबू नये,तसेच मोबाईल जवळ असेल तर इंटरनेट वापरू नये शेतकर्यांनी या सर्व बाबींची काळजी घ्यावी असे अवाहन तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी केले आहे.

COMMENTS