Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांडपाणी शुद्धीकरणातून एकलहरे येथे वृक्ष व बागेचे संवर्धन ; महावितरणचा उपक्रम

नाशिक :  महावितरने जलसंवर्धासाठी पुढाकार घेत  दैनदिन वापरातून वाया जाणाऱ्या पाण्याचा म्हणजे मुख्यत्वे आंघोळ व इतर सांडपाण्याचा (ग्रेवॉटर) शुद

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू
राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन
बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न

नाशिक :  महावितरने जलसंवर्धासाठी पुढाकार घेत  दैनदिन वापरातून वाया जाणाऱ्या पाण्याचा म्हणजे मुख्यत्वे आंघोळ व इतर सांडपाण्याचा (ग्रेवॉटर) शुद्धीकरण करून पुनर्वापर करीत महावितरणच्या एकलहरे येथील  राज्यस्तरीय प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रातील आवारात असलेल्या वृक्ष, फुलझाडे आणि बाग यांचेकरीता वापर करण्यात येत आहे. यासाठीच्या पाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन महावितरणचे संचालक (संचलन / मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.  यामधून वर्षाला १० लाख लिटर शुद्ध पाण्याची बचत होणार आहे.
निवासी, कार्यालय किंवा वस्तीगृह तत्सम इमारतीमधील रहिवाशांच्या दिनचर्या  जसे स्नान, वॉशिंग मशीन, वॉश बेसिन यासारखा वापरानंतर वाया जाणारे पाणी म्हणजेच ग्रेवॉटर. हे पाणी एकूण सांडपाण्यापैकी सुमारे ६५% इतके असते. दैनंदिन काळात जागतिक जलसंपत्तीचा पुरवठा  कमी होत आहे. जलसंवर्धन आणि पुनर्वापर करण्यासाठी महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे नाशिकचे  मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे यांच्या संकल्पनेतून या परिसरातील निवासी प्रशिक्षणार्थी  इमारतीमधून येणारे दैनंदिन वापर होणारे  ग्रेवॉटरसाठी शुद्धीकरण  प्रकल्पाची नुकतीच उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये  ही पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. सदर प्रकल्पाची शुद्धीकरण प्रक्रिया क्षमता ८ हजार  लिटर प्रतिदिन असून, प्रकिया  झालेले पाणी हे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राच्या परिसरातील संपूर्ण वृक्ष व फुलबागेच्या संवर्धनासाठी वापर  करण्यात येत आहे. या पाण्याच्या वापरामुळे दैनंदिन प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राच्या परिसरातील संपूर्ण झाडांसाठी लागणारे अंदाजित  ४ हजार ५०० लिटर पाणी या माध्यमातून मिळत आहे.  म्हणजेच वार्षिक अंदाजे १० लाख लिटर पाण्याचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. तसेच या पाण्याच्या सवंर्धनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या  पाण्याचा भार कमी होऊन जल संवर्धनास मदत होणार आहे.

सदर प्रकल्प उभारणीची संकल्पना मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संगीता गजबे , सहायक अभियंता गिरीष मोरे व  रुपेश खरपकार यांनी परिश्रम घेत मे. जलकॉन्सर्व्ह टेक्नोनॉलॉजि प्रा. ली. याचे मार्फत उभारणी करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाचे उद्घाटन  प्रसंगी  महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांनी कौतुक करीत महावितरणने वीजबचतीसोबत जलसंवर्धनसाठी घेतलेल्या  पुढाकार  व उपक्रमाबद्दल  प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS