Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमिनीचा वाद पेटला, रस्त्यात अडवून शेतकर्‍याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून

मुरुड प्रतिनिधी - शेती बदलीच्या कारणावरुन कुरापत काढून गैरकायद्याने एकत्र जमत एकावर कुर्‍हाड, सत्तुरने वार करुन एकाचा खून केल्याची घटना लातूर ता

राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अतिक्रमणात असल्याचा अहवालात स्पष्ट उल्लेख
वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान
नंदुरबार राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा

मुरुड प्रतिनिधी – शेती बदलीच्या कारणावरुन कुरापत काढून गैरकायद्याने एकत्र जमत एकावर कुर्‍हाड, सत्तुरने वार करुन एकाचा खून केल्याची घटना लातूर तालुक्यातील शिराळा येेथे घडली. याप्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात शनिवारी नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज काळे (43, रा. शिराळा, ता. लातूर) असे मयताचे नाव आहे. मुरुड पोलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील शिराळा येथील आरोपी बाळासाहेब काळे, गोपाळ काळे, मनोहर काळे, राजेभाऊ काळे, कविता काळे, अनिता काळे, ओम काळे, संभाजी काळे, गणेश काळे हे नऊ जण शुक्रवारी गैरकायद्याने एकत्र जमले. दरम्यान, धनराज काळे हे ट्रॅक्टर (एमएच 24, बीएल 4509) वरुन घराकडे येत होते. तेव्हा या नऊ जणांनी त्यांचे ट्रॅक्टर अडविले. शेती बदलीची कुरापत काढली आणि धनराज काळे यांच्या डोक्यात, हाता-पायावर, पाठीत कुर्‍हाड, सत्तुर, कोयता आणि रॉडने वार करण्यास सुरुवात केली. त्यात ते जागीच ठार झाले. दरमयान, फिर्यादी अमोल काळे व साक्षीदार ऋषिकेश काळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दोन्ही हाताच्या मनगटावर, डाव्या पायाच्या गुडघ्यावर, डोक्यात, हाताच्या कोपर्‍यावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमोल काळे यांच्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये वरील नऊ जणांविरुध्द मुरुड पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. डी.एस. ढोणे हे करीत आहेत.

COMMENTS