Homeताज्या बातम्यादेश

विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत उलटली

18 विद्यार्थी बेपत्ता, 16 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश

पाटणा/वृत्तसंस्था : बिहार राज्यातील मुजफ्फरपूरमध्ये गुरूवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली नाव बागमती नदीत उलटून अपघात झाला. अपघातग्रस्त नावेत

बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पोलिस शहीद
धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात येणार 10 हजार रेमडीसीविर

पाटणा/वृत्तसंस्था : बिहार राज्यातील मुजफ्फरपूरमध्ये गुरूवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली नाव बागमती नदीत उलटून अपघात झाला. अपघातग्रस्त नावेत 34 विद्यार्थी होते. त्यापैकी 18 विद्यार्थी बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.
इतकी भीषण दुर्घटना होऊनही,  इथे मदत आणि बचावकार्य करणारी यंत्रणा पोहोचण्यास तासापेक्षा जास्त अवधी लागला. त्यामुळे मुजफ्फरपूरमधील नागरिकांच्या संतापाचा पारा चढला. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोध आणि बचावकार्य सुरु आहे. मुजफ्फरपूरमध्ये गुरुवारी सकाळी एक नाव विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या नावेत 34 विद्यार्थी होते. बागमती नदीतून जाताना अचानक नाव डळमळू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर ही नाव उलटली. स्थानिक रहिवासी राकेश कुमार यांनी सांगितले की, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले होते. यामुळेच नदीच्या मध्ये पोहोचल्यानंतर बोट डळमळू लागली. यानंतर बोट अनियंत्रित होऊन उलटली. नाविक आणि त्याच्या सहकार्‍याने आधी काही मुलांना वाचवले. यानंतर स्थानिक लोकांनीही नदीत उडी घेतली आणि काही मुलांना बाहेर काढले. उर्वरित बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. ही घटना काल सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी अपघातस्थळी धाव घेतली, अशी माहिती मुझफ्फरपूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.

अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना मदत देणार : मुख्यमंत्री नितीश कुमार – या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी घटनेची चौकशी करत आहेत. या अपघातात बाधित झालेल्या कुटुंबांना सरकारकडून मदत दिली जाईल, असे आश्‍वासन नितीश कुमार यांनी दिले, आहे. दरम्यान या घटनेनंतर नदीकिनार्‍यावरील मधुरपट्टी घाटाजवळ शेकडो नागरिकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. नदीकिनारी बेपत्ता मुलांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरु आहे. बेपत्ता मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

COMMENTS