Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या

पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी मार्च २०२६ पर्यंत
“नरभक्षक बिबट्या ठार मारा! माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा थेट वन मंत्र्यांना फोन
ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार : गृह राज्यमंत्री योगेश कदम

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंगळवारी 22 वी ऊस परिषद पार पडल्यानंतर बुधवारी आंदोलन सुरू झाले आहे. येत्या 3 दिवसात कारखानदारांनी निर्णय घ्यावा. अन्यथा दिवाळीनंतर आक्रमक आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात येणारे ट्रॅक्टर पेटवले आहेत. कारदगा परिसरात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं.

COMMENTS