Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर बाजार समिती निवडणुकीत 49 जणांची माघार; राष्ट्रवादी विरूध्द शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी 85 पैकी 49 अर्ज माघार घेण्यात आले. त

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरीता प्रयत्न करणार :मंत्री छगन भुजबळ
4 हजार 250 कोटींचा हेलिप्लांट प्रकल्प हवेतच ?उद्योगमंत्री उदय सामंतांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये राजकीय भूकंप
कृष्णा कारखान्याचा सीएनजी पंप लवकरच कार्यान्वित होणार : डॉ. अतुल भोसले

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी 85 पैकी 49 अर्ज माघार घेण्यात आले. तर राष्ट्रवादीचे माजी सभापती आनंदराव पाटील साखराळे यांचा अर्ज अपात्र ठरला. त्यांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
सहकारी संस्था गट सर्वसाधारण मतदार संघ – 15, महिला मतदार संघ – 4, इतर मागास प्रर्वग संघ – 2, भ.वि.जा./ज मतदासंघ – 2, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ – 3, अनु.जाती / जमाती मतदारसंघ – 2, आर्थिक दुबर्ल मतदार संघ – 2, आडते व व्यापारी मतदार संघ – 4, हमाल व तोलाईदार मतदार संघ – 2 असे एकूण 36 अर्ज शिल्लक राहिले आहेत.
राष्ट्रवादी विरोधात प्रथमच सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित येत शेतकरी परिवर्तन पॅनेल उभा करत एकास एक उमेदवार दिले आहेत. या बाजार समितीवर राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील व स्व.आ. विलासराव शिंदे गटाची सत्ता होती. गेली अनेक वर्षे विरोधकांच्यात एकी दिसून येत नव्हती. यामुळे राष्ट्रवादी चे सर्व उमेदवार निवडूण येत होते. यावेळी मात्र विरोधकांनी चांगलाच चंग बांधला असून शेतकरी पॅनेलच्या झेंड्याखाली एकत्रित येत एकत्र लढत देण्याचे ठरले आहे.

COMMENTS