Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांचे वंशज हतबल होऊच शकत नाही” 

उदयनराजेंच्या अश्रुंवर फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील र

लाठीहल्ल्याप्रकरणी सरकारची माफी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी येथे दिली भेट 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याच प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, यादरम्यान ते भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यावरच आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही राजेंच्या पाठीशी आहोत. त्यांना हतबल होऊ देणार नाही, ते शिवरायांचे वंशज आहेत ते हतबल होऊ शकत नाही” असही फडणवीस म्हणाले.

COMMENTS