Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

इस्लामपूर / प्रतिनिधी : गोटखिंडी गावातील हुतात्मा गटाला मोठे खिंडार पडले असून हुतात्मा गटाचे खंदे कार्यकर्ते, गोटखिंडी विकास सोसायटीचे संचालक,

पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपल्यानंतर मंत्री जयंत पाटील 5 वर्षाने इस्लामपूर पालिकेत
Buldhana : आपण एकजूट दाखवली नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही – डाॅ.राजु वाघमारे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोर्टाचा पुन्हा धक्का; गुन्ह्यातून वगळण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

इस्लामपूर / प्रतिनिधी : गोटखिंडी गावातील हुतात्मा गटाला मोठे खिंडार पडले असून हुतात्मा गटाचे खंदे कार्यकर्ते, गोटखिंडी विकास सोसायटीचे संचालक, दिलीप भीमराव पाटील (भडकंबेकर), वसंत सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे माजी अध्यक्ष सर्जेराव भाऊसो पाटील, प्रगतशील शेतकरी संजय कदम, हिंदुराव माळी, विलास लोंढे व असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी राजारामनगर येथे त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच विजयराव लोंढे, राजारामबापू सहकारी दूध संघाचे संचालक धैर्यशील थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.
हुतात्मा गटाचे कार्यकर्ते बाजीराव ज्ञानू लोंढे, पोपट घारे, सुनील घारे, सुधीर जाधव, हर्षल पाटील, शामराव येवले, प्रविण थोरात, विजय वाजे, संभाजी घारे, आनंदराव येवले, राजेंद्र घारे, हणमंत पाटील (शिराळकर), जालिंदर पाटील, सचिन पाटील, हैबत घोडसे, निलेश येवले, बाबुराव गावडे, सचिन कोळेकर, शैलेश टिबे, तुषार गावडे, हणमंत कदम, संपत सूर्यवंशी, संदीप मोरे, विजय गावडे, गुंडा बादरे, ओमकार पाटील, राम पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राजारामनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

COMMENTS