Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त चित्रमयप्रदर्शन राज्यात आयोजित करावे : सहकार मंत्री

मुंबई / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक आह

पसरणी घाटात अज्ञातांकडून वणवा; आगीच्या ज्वाळांमुळे काही काळ वाहतूक ठप्प
पावसाने उघडीप दिल्याने दिवाळीनिमित्त पालकमंत्र्यांचे शेतकर्‍यांच्या बांधावर दौरे
पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या नैसर्गिक सौंदर्यात सेल्फी पॉइंटची भर; पर्यटकांची तुफान गर्दी

मुंबई / प्रतिनिधी : राज्य शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक आहे. या प्रदर्शनामुळे शासनाचे निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात शासनाने सामान्य जनतेला मदतीचा हात देण्याबरोबर प्रत्येक क्षेत्रात लोकाभिमुख निर्णय घेऊन काम केले. शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देणार्‍या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित चित्रमय प्रदर्शनाचे मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात आयोजन केले आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या प्रदर्शनास भेट दिली.
प्रदर्शनातील सर्व विभागांच्या फलकांजवळ थांबून पहाणी केली त्यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार दीपक चव्हाण सोबत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांनी प्रदर्शन आयोजित करण्याची भूमिका आणि संकल्पना यांची माहिती दिली. यावेळी उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर उपस्थित होते.
दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ ही संकल्पना ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचवणे आवश्यक आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हे प्रदर्शन राज्यभर आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करावे, अशा सूचना ना. पाटील यांनी यावेळी केली. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 360 डिग्री व्हिडीओ सेल्फी पॉईंटबद्दल कौतुकाने चौकशी करून ना. पाटील यांनी उत्साहाने व्हीडिओ सेल्फी काढून घेतला.
या प्रदर्शनात सहकार, पणन या विभागाने केलेल्या कामगिरीबरोबरच आरोग्य, मदत व पुनर्वसन, कृषी, उद्योग आदी विविध विभागांच्या निर्णयांच्या फलकांची आणि संबंधित छायाचित्रांची सहकार मंत्र्यांनी आवर्जून पाहणी केली.
राज्य शासनातर्फे दोन वर्षे विकासाची महाराष्ट्र शासनाची ही संकल्पना राबविण्यात आली.
सरकार स्थापन झालेनंतर 2 ते 3 महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि या संकटावर मात करत सरकारने राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू ठेवली. आता कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना हे राज्य विकासाच्या दृष्टीने देशात अवल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मानस आहे,अशी प्रतिक्रिया ही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिल्या.

COMMENTS