कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील

Homeअहमदनगर

कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील

अहमदनगर प्रतिनिधी -  शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुका माता देवस्थानच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल

भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण
रसाळगुरूजींचे रसाळ ’बोधामृत’ जीवनपोषक ः डॉ. बाबुराव उपाध्ये
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत आ. सत्यजीत तांबे आक्रमक 

अहमदनगर प्रतिनिधी – 

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुका माता देवस्थानच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज नगर तालुका तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी तहसीलदार पाटील म्हणाले की,आपल्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आल्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

यासाठी देवीचरणी कोरोनाचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली 

यावेळी याप्रसंगी यावेळी अध्यक्ष प्रभाकर भोर,खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त साहेबराव भोर,राजू भोर,दत्तात्रय विटेकर,गोरख कातोरे,विष्णू भोर,किरण सप्रे,कचरू भोर,सुखदेव सप्रे,किरण कतोरे,नगरसेवक राजेश कातोरे,अभिजित खोसे,भैया वाबळे,रोहन बारस्कार आदिसह देवस्थानचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते.

COMMENTS