Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर हवामान ढगाळ राहील. तसेच मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वार्‍य

धानोरे घाटावर ‘शिवतीर्थ’ साकारअहिल्यानगर जिल्ह्यात पहिलेच स्थळ
४५ गावांच्या पाणीपुरवठ्याचे स्वागत; मात्र १३ गावांच्या योजनेवर परिणाम नको : काकडे
केंद्रसरकारकडून रॉकेल वाटपास मंजुरी

मुंबई : राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर हवामान ढगाळ राहील. तसेच मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वार्‍यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीच्या कामांचे नियोजन करावे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकर्‍यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

COMMENTS