Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडमध्ये तटकरे-गोगावले वाद टोकाला

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्य

तलाठ्याच्या चुकीमुळे वृध्द निराधार महिलेचे झाले पैसे बंद
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
‘दिशा कृषी उन्नतीची- २०२९’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा- उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले यांचा वाद टोकाला पोहचला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान हाणामारीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले म्हणाले की, विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. आम्ही कोणती दंडेलशाही करत नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर हत्यारे घेऊन हल्ला करण्यासाठी गुंड पाठवले गेले. जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे. पोलिस चौकशीनंतर या घटनेचा तपास केला जाईल. आमच्यावर हत्यारे घेऊन येणार्‍या या हल्लेखोरांची चौकशी सर्वांसमोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS