पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी अर्ज करावे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी अर्ज करावे

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दि. 30 ऑगस्ट 2025 पर्य

आई, ताई, बाबा, भाऊ, आजी-आजोबा मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सदृढ करा !
खड्ड्यांना वैतागलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्याला चालवले चिखलातून (Video)
गुजरातमधील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दि. 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या निवडीनुसार व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य करण्यात येते. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी आर्थिक वर्ष 2025-2026 साठी अनुदान उपलब्ध झाले आहे.

त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आवश्यक कागदपत्रांसह 30 ऑगस्ट, 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. 2, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

COMMENTS