पर्यटन हा अलीकडे मध्यमवर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. अर्थात, देशाच्या अर्थकारणाम

पर्यटन हा अलीकडे मध्यमवर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. अर्थात, देशाच्या अर्थकारणामध्येही पर्यटनाचा मोठा सहभाग असतो. परंतु, हल्लीच्या काळात पर्यटनाला जाणारे, भूप्रदेश, शहरं, जंगले, नद्या, सेंचुरीज हे बघण्यासाठी जरी जात असले, तरी, हल्लीच्या काळात दुरावलेले नातेसंबंध आणि त्यांच्याशी जुळवून न घेणारे आप्तजन, या सगळ्या कारणामुळे एकमेकांच्या भेटीगाठींना न जाता पर्यटनाच्या दिशेने जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. अर्थात, यासाठी दोन प्रमुख कारणे कारणीभूत आहेत. एक तर खिशात खळाळणारा पैसा आणि दुसरं नात्यांमध्ये आलेला दुरावा आणि त्यामुळे आलेला एकांत, हा कुठेतरी विरंगुळा म्हणून भेटीत करावा. यातूनच लोक पर्यटन करतात. परंतु, जेव्हा लोकांची ही गर्दी एखाद्या ठिकाणी जास्त होते; त्यावेळी काय घटना घडते, हे आपल्याला काल इंद्रायणी नदीवरील कोसळलेल्या पुलाच्या स्थितीवरून दिसतं. सध्या पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. मावळ तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने जोर धरला आहे. इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. गेले दोन दिवस पावसाने जोर धरला आहे.त्यामुळे नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवार असल्याने अनेक पर्यटक हे कुंडळा परिसरात आले. याच दरम्यान जूना पुल कोसळला ज्यात अनेक प्रवासी वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पुल कोसळण्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत 25 पर्यटक नदीत वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सहा जणांवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुंडमळा हे पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण आहे. रविवार असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. अनेक पर्यटक गाड्यांसह या पुलावरून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे पुलावर जास्त वजन पडल्याने तो कोसळला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील पायाभूत सुविधांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. आता इतर पर्यटकांचा शोध हा सुरू आहे. हा पूल अत्यंत जुना असल्याचेही सांगितले जात आहे. “इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता, कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामुळेच ही दुर्घटना नेमकी का झाली? असे विचारले जात आहे. पुलावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून एकूण 50 पर्यटक जात होते. त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने हा पूल क्षणात तुटला आणि त्यावरून जाणारे पर्यटक थेट नदीत कोसळले.
COMMENTS