Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांना सवलत दिल्याने एसटी तोट्यात : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : काही दिवसांपूर्वीच महिलांना एसटी बसमध्ये 50 टक्के सवलत दिल्यामुळे महिलांचा प्रवास वाढला असून, त्यामुळे एसटीचे उत्पन्न देखील वाढल्याची मा

मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी स्थगित
मिरजेतील अपघातात 5 जणांचा मृत्यू
कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीला तडे

मुंबई : काही दिवसांपूर्वीच महिलांना एसटी बसमध्ये 50 टक्के सवलत दिल्यामुळे महिलांचा प्रवास वाढला असून, त्यामुळे एसटीचे उत्पन्न देखील वाढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र महिलांना सवलत दिल्यामुळेच एसटी तोट्यात असल्याची धक्कादायक कबुली परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. महिलांना व जेष्ठांना एसटी प्रवासात सवलतीमुळे एसटीला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होतो. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही, असे वक्तव्य देखील सरनाईक यांनी केले आहे.
धाराशीवमध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या, अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे महायुती सरकारच्या एसटी प्रवासात महिलांच्या सवलत योजनेमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुलीत जणू परिवहन मंत्री यांनी दिली आहे. गेल्या सरकार काळामध्ये महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची योजना जाहीर करण्यात आली. तर ज्येष्ठांना मोफत बस देण्याची योजना आणण्यात आली. यानंतर महिलांनी मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास केल्याची आकडेवारी महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केली होती. या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून राज्य सरकार करण्यात आला. मात्र, राज्य सरकारने हे आरोप फेटाळले होते. आज अखेर यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जाहीर कबुली दिली आहे. महिलांना, ज्येष्ठांना देण्यात आलेल्या सवलतीमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली. महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली. यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतो आहे, असे सरनाईक म्हणाले. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्ये केले. लाडक्या बहिणींना बस मध्ये 50% सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे. अशीच सवलत आपण जर सर्वांना देत बसलो तर मला असे वाटते महामंडळ चालवणे कठीण होईल, त्यामुळे सध्या तरी या मागणीचा मी विचार करू शकत नाही. गाव खेड्यापर्यंत एसटी पोहोचली पाहिजे. ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे पुढे ते म्हणालेत.

COMMENTS