Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापूर अत्याचारग्रस्त बालिकांना न्याय द्या

नराधमांना फाशी देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

पाथर्डी ः दोन दिवसांपूर्वी बदलापूर येथे शाळेत शिकत असलेल्या दोन चिमूकल्या मुलीवर अत्याचार केलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा देत त्यांना पाठीशी घाल

चालकाला चक्कर आली व जीप खड्ड्यात गेली ; अपघातात दोन महिलासह तीन जखमी
सावधान! माळढोक पाठोपाठ लोकशाही संपवण्याचा डाव
नगरमध्ये पहाटेच्या अजानच्या वेळेस भोंगे शांतच…

पाथर्डी ः दोन दिवसांपूर्वी बदलापूर येथे शाळेत शिकत असलेल्या दोन चिमूकल्या मुलीवर अत्याचार केलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा देत त्यांना पाठीशी घालणार्‍या पदाधिकार्‍याला अटक करुन त्या चिमुकल्या बालिकांना न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली असून, यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उद्धव नाईक यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, तालुकाध्यक्ष सविता भापकर, रत्नमाला उदमले, मनीषा ढाकणे, सपना काटे, यमुना उराडे, ज्योती उराडे, सुमन काळे, मीरा भापकर,अनिता डमाळे, नंदा खोर्दे आदींनी हे निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी बदलापूर येथे शाळेत शिकणार्‍या दोन चिमुकल्या मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला.त्यानंतर पोलिस स्टेशनला तक्रार करायला गेलेल्या पालकांता 12 तास तक्रार न घेता बसवून ठेवण्यात आले.शाळेचा पदाधिकारी जो भाजप पक्षाचा समर्थक आहे.त्याने तक्रार देऊ नये म्हणून पालंकावर दबाव आणला.या अमानुष घटनेची शासनाने तातडीने दखल घेऊन अत्याचार करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच खरंतर मागच्या अनेक वर्षापासुन भाजप सरकारच्या काळात आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत.त्यांचा गुन्हेगारांवर. वचक राहीलेला नाही शिवाय बहुतांशी अत्याचाराच्या घटनांमध्ये भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी दिसत आहेत. त्यामुळेच आमची मागणी आहे की, गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तातडीने राजीनामा देऊन पिडीत बालीकांना न्याय द्यावा ! लाडकी बहीन नव्हे सुरक्षित बहीन हवी। असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.

COMMENTS