Homeताज्या बातम्याविदेश

सुवर्णपदकाविनाच संपली भारताची मोहीम

ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप ; पदकतालिकेत भारताची घसरण

पॅरिस ः जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या भारतात मात्र प्रत्येकवेळी ऑलिम्पिक पदकाची उणीव भासते. यावेळी तर भारताची मोठी घसरण झाली असून भारताने केव

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
विरुष्का दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?

पॅरिस ः जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या भारतात मात्र प्रत्येकवेळी ऑलिम्पिक पदकाची उणीव भासते. यावेळी तर भारताची मोठी घसरण झाली असून भारताने केवळ 1 रौप्य आणि 5 कांस्यपदके कमावली आहेत. तर यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताची मोहीम सुवर्णपदकाविनाच संपल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्राविषयी दुरगामी निर्णय घेण्याची गरज निर्माण होतांना दिसून येत आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम शनिवारी रात्री भारतीय कुस्तीपटू रितिका हुडाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे संपली, तर रविवारी रात्री 12 वाजता ऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप झाला.

या स्पर्धेत भारतासाठी, महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये मनू भाकर, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्रीत मनू भाकर आणि सरबज्योत सिंग, पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये स्वप्नील कुसळे, कुस्ती आणि हॉकीमध्ये अमन सेहरावत यांनी एकत्रितपणे 5 कांस्यपदके जिंकली. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले. भारताने एकूण 6 पदके जिंकली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ पदकतालिकेत 48 व्या क्रमांकावर होता. यावेळी भारतीय संघ 71 व्या स्थानावर घसरला आहे. 11 ऑगस्ट रोजी 13 पदक स्पर्धा होणार असल्याने ही संख्या आणखी खाली जाऊ शकते. टोकियोच्या तुलनेत पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत भारताची घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे सुवर्णपदक न जिंकणे. भारताला केवळ एक रौप्य पदक मिळाले, जे टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने जिंकले. भारताची पाचही पदके कांस्य आहेत. भारतीय खेळाडूंनी नेमबाजीत 3 कांस्यपदके जिंकली. हॉकीमध्ये एक कांस्यपदक आणि कुस्तीमध्ये एक पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक खेळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहेत, परंतु पॅरिस ऑलिम्पिकनंतर भारताच्या पदकांची संख्या वाढू शकते. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीमध्ये रौप्य पदक देण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी होणार आहे. जर विनेशने हे आवाहन जिंकले तर ती रौप्य पदक जिंकणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू बनेल आणि भारताची पदक संख्या 7 वर पोहोचेल. असे झाल्यास भारत पदकतालिकेतील स्थान वरचे राहील.

चीनने जिंकले सर्वाधिक सुवर्ण – पदकतालिकेवर नजर टाकली तर चीन अव्वल आहे. चीनने एकूण 90 पदके जिंकली आहेत. त्यात 39 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदक आहेत. सुवर्णपदक जास्त जिंकल्याने चीन पहिल्या क्रमांकावर आहे. यूएसए दुसर्‍या स्थानावर आहे. यूएसएने 38 सुवर्णांसह 122 पदके जिंकली आहेत. त्यात 42 रौप्य आणि 42 कांस्य पदकांचा समावेश आहे.

विनेशच्या पदकाचा निर्णय 13 ऑगस्टला – भारताला अजूनही सातवे पदक मिळू शकते. अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगाटने 50 किलो गटात कुस्तीची अंतिम फेरी गाठली होती. तिने भारतासाठी पदक निश्‍चित केले होते, परंतु अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त होते, ज्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. आता 13 ऑगस्ट रोजी क्रीडा लवाद न्यायालय विनेशच्या पदकावर निर्णय देईल. या स्पर्धेत भारताच्या मनासारख्या कोणत्याच गोष्टी घडल्या नाहीत. त्यामुळे भारताला सुवर्णपदक मिळू शकले नाही.

ऑलिम्पिकमधील पदक विजेते
मनू भाकर- कांस्यपदक, नेमबाजी
मनू भाकर/सरबज्योत सिंग- कांस्य पदक, नेमबाजी
स्वप्नील कुसळे – कांस्यपदक, नेमबाजी
भारतीय हॉकी संघ – कांस्य पदक
नीरज चोप्रा- रौप्य पदक, ऍथलेटिक्स
अमन सेहरावत- कांस्यपदक, कुस्ती

COMMENTS