Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र ताहाराबादला ’पांडुरंग उत्सवा’ ला सुरूवात

2 ऑगस्टला दहीहंडी तर 4 तारखेला पाऊलघडी सोहळा

देवळाली प्रवरा ःप्रतीपंढरी समजल्या जाणार्‍या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराजांच्या समाधी मंदिरात सोमवार

राहुरीमध्ये आणखी एका पोलिस कर्मचार्‍याचा आत्महत्येचा इशारा
आमदार निलेश लंकेच्या आंदोलनास पाथर्डीत संमिश्र प्रतिसाद
Sangamner : संगमनेर येथील पाच कत्तलखाने सील| LokNews24

देवळाली प्रवरा ःप्रतीपंढरी समजल्या जाणार्‍या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराजांच्या समाधी मंदिरात सोमवार 29 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत साजर्‍या होणार्‍या’पांडुरंग महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. प्राचीन परंपरेनुसार श्रीक्षेत्र पंढरपूर येथून ’मूळ’ लावून पंढरीच्या विठोबाला अगत्याने श्रीक्षेत्र ताहाराबाद क्षेत्री आणण्यासाठी व आषाढवारीसाठी गेलेले असंख्य वारकरी आता प्रतीपंढरीकडे परतीच्या मार्गावर आहेत. या पायी दिंडी सोहळ्याचे व पांडुरंगाचे आषाढ वद्य नवमीला ताहाराबाद क्षेत्रात आगमन होणार आहे. श्री संत कवी महिपती महाराजांच्या ’चित्ती धरीली वासना, सिद्धी न्यावी नारायणा’ या ओवीनुसार साक्षात पंढरीचा पांडुरंग महिपती महाराजांच्या भेटीसाठी श्रीक्षेत्र ताहाराबादला येणार म्हणून पंचक्रोशीत भक्तीभावाचे तरंग उठले आहेत. या पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी परिसरातील भाविक सज्ज झाले आहेत. श्रीक्षेत्र निवासी पांडुरंगाचे श्रीक्षेत्र ताहाराबादला महिपती महाराजांच्या भेटीसाठी आगमन होताच राज्यातील 400 ते 500 पायी दिंडी पालख्यांचेही बुधवार 31 जुलै रोजी कामिका एकादशीच्या पर्वणीला श्रीक्षेत्र ताहाराबादला आगमन होणार आहे. बुधवारी 31 जुलै रोजी एकादशीनिमित्त सकाळी 6 वा. दिलीपराव भिकाजी जगताप सपत्नीक यांच्या हस्ते महाभिषेक होईल. तर सकाळी 10 वा. नाना महाराज गागरे यांचे कीर्तन होईल. दुपारी 4 वा. सुधाकर महाराज आहेर यांचे कीर्तन होईल.

रात्री 8 वा. एकनाथ महाराज चत्तर यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. रामदास महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन तर दुपारी 4 वा. मनोहर महाराज सिनारे यांचे प्रवचन होईल. रात्री 8 वा. विकास महाराज गायकवाड यांचे कीर्तन होईल. शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे फडकर्‍यांचे काल्याचे किर्तन होईल.तर दुपारी 4 वा. मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांचे पांडुरंग महोत्सवाचे काल्याचे किर्तन होऊन नयनरम्य दहीहंडीने सोहळ्याची सांगता होणार आहे.’पांडुरंग महोत्सव’ कालावधीत पांडुरंगाचे आगमन, भिक्षा कार्यक्रम, अभिषेक, काकड आरती, नैवेद्य, हरिपाठ, पूजा, कुलधर्म, पवमान अभिषेक, द्वादशी पारणे, छबीना मिरवणूक होऊन रविवार दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वा. लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या ’पाऊलघडीच्या’ कार्यक्रमाने पांडुरंग महोत्सवाची सांगता होणार आहे. या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन अर्जुन महाराज तनपुरे,अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, ज्येष्ठ विश्‍वस्त माजी खा. प्रसाद तनपुरे, आसाराम ढुस, दादासाहेब इंगळे, डॉ. सुखदेव हारदे,शिवाजी कोळसे, मच्छिंद्र कोहकडे, सुरसिंग पवार, बाबासाहेब वाळुंज,अशोक देशमुख, दत्तात्रय जगताप,रमेश नालकर, शिवाजी बंगाळ, अँड.अशोक किनकर,सुभाष शिरसाठ, सतीश क्षीरसागर, बापूसाहेब गागरे, श्रीकृष्ण कांबळे, संजय कांबळे, सुशीला वराळे, सुशीला मुसमाडे, सुगंधाबाई बानकर, सचिव बाळासाहेब मुसमाडे, व्यवस्थापक सर्जेराव हारदे, सरपंच निवृत्ती घनदाट,उपसरपंच मोनाली जगताप,माजी उपसरपंच पप्पू माळवदे, सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर औटी, माजी अध्यक्ष सीताराम झावरे, पोलीस पाटील किरण उदावंत,यात्रा समिती अध्यक्ष दत्तात्रय हारदे आदींसह भाविकांनी केले आहे.

सात दिवस चालणार उत्सव- गेल्या अनेक वर्षांपासून प्राचीन  धार्मिक परंपरेनुसार हा उत्सव 7 दिवस सुरू असतो. नवमीला पांडुरंगाचे ताहाराबाद क्षेत्री आगमन होते. त्यानंतर भाविकांचा पाहुणचार घेऊन अमावस्येला पांडुरंग आपल्या पंढरीला प्रस्थान ठेवतात.’पाऊलघडी’ च्या सोहळ्यात पहाटे महिपतींच्या देऊळवाड्यात अंथरलेल्या गुलाल-बुक्क्यावर पांडुरंगाने पंढरीकडे प्रस्थान ठेवल्याच्या साक्षात ’पाऊलखुणा’ उमटतात. त्याचे दर्शन घेऊन लाखो भाविकांची मांदियाळी धन्य झालेली असते.

COMMENTS