Homeताज्या बातम्या

2500 शिक्षकांचा ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार

दीड लाख विद्यार्थांचे भविष्य धोक्यात

अहमदनगर प्रतिनिधी - 12 वीचे पेपर राज्यात सुरू होणार असुन आता 2500 शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 12 वीच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार ट

सामाजिक भावनेतून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा अमोल गर्जे यांनी स्वखर्चाने बुजवला
गावातील कीर्तनकारांच्या सेवेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
‘निळवंडे’च्या लाभक्षेत्रातील सर्वांना पाणी देणे हेच उद्दिष्ट; माजी मंत्री थोरात; संगमनेरात ‘युवा संगम’ कार्यक्रम उत्साहात  

अहमदनगर प्रतिनिधी – 12 वीचे पेपर राज्यात सुरू होणार असुन आता 2500 शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 12 वीच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे दीड लाख विद्यार्थांचे भविष्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान विषय संघटनेने  23, 24 आणि 25 मार्चला होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या बारावी बोर्ड ऑनलाइन परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. गेली 21 वर्ष अल्प वेतनावर हे सर्व शिक्षक कार्यरत आहे. महाराष्ट्रातून इयत्ता 12 वी आयटी ऑनलाईन बोर्ड परीक्षेसाठी 1 लाख 60 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट होणार असून 2500 पेक्षा जास्त शिक्षक या प्रक्रियेत कार्यरत आहेत. शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही , तर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा घेणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे. शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे व शिक्षक मान्यते पासून सेवा गृहीत धरावी या मागणीसाठी आय.टी. विषय संघटना परीक्षा बहिष्कारवर ठाम आहे.

COMMENTS