शिक्षक पात्रता परीक्षेची वैधता आजन्म

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक पात्रता परीक्षेची वैधता आजन्म

शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची मर्यादा आता आजन्म करण्यात  आली आहे. त्यामुळे याचा फायदा शिक्षकी पेशा निवडणार्‍या उमेदवारांना होणार आहे.

जबरदस्तीने विहीर नावावर करून घेणाऱ्या तिघा सावकारांविरुद्ध गुन्हा
जेष्ठ मल्याळम अभिनेते इनोसेंट यांचे निधन
तटरक्षक दलाने वाचवले मच्छिमाराचे प्राण

नवीदिल्लीः शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची मर्यादा आता आजन्म करण्यात  आली आहे. त्यामुळे याचा फायदा शिक्षकी पेशा निवडणार्‍या उमेदवारांना होणार आहे. या अगोदर या प्रमाणपत्राची वैधता सात वर्षासाठी होती. या कालावधीत जर उमेदवाराला नोकरी लागली नाही, तर पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे आता या निर्णयामुळे इच्छुक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी प्रमाणपत्राची वैधता आजन्म केल्याची घोषणा केली आहे.

पोखरियाल म्हणाले, की राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या उमेदवारांना नवे प्रमाणपात्र देण्याचे आदेश देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच 2011 या वर्षानंतर  ज्या उमेदवाराचे शिक्षण पात्रता प्रमाणपत्र समाप्त झाले आहे, त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2011 या वर्षापासून टीईटी प्रमाणपत्राची वैधता आजन्म करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळण्यास मदत होईल. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 2011 या वर्षांपासून लागू होणार आहे. ज्या उमेदवारांचे सर्टिफिकेट 2011 वर्षानंतर समाप्त झाले आहे, त्यांना आजन्म प्रमाणपत्र नव्याने मिळेल. तसेच शिक्षण भरतीसाठी हे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवायची असेल तर टीईटी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. जे उमेदवार पास होतात त्यांनाच शिक्षक म्हणून  मिळते. अगोदरच्या नियमानुसार सात वर्षांच्या आत उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होता. मुदत संपल्यावर पुन्हा उमेदवारला टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS