मनपा निवडणुकांतून ओबीसींचे होणार नुकसान; प्रा. शिंदे यांचा महाविकासवर ठपका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा निवडणुकांतून ओबीसींचे होणार नुकसान; प्रा. शिंदे यांचा महाविकासवर ठपका

अहमदनगर/प्रतिनिधी- राज्यभरातील नुकत्याच जाहीर झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीमुळे ओबीसींच

वारेंचा हट्टीपणा, मोरेंची माघार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शनास सुरूवात
गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी- राज्यभरातील नुकत्याच जाहीर झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीमुळे ओबीसींचे नुकसान झाल्याचा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या वॉर्ड रचनेचा आदेश दिल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसी समाजाचे जबरदस्त नुकसान झाले आहे, असा दावा करून भाजप प्रा. शिंदे म्हणाले, महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या आगामी काही महिन्यात होणार्‍या निवडणुकांत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा संशय या सरकारच्या ढिलाईवरून येतो, असाही आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील अठरा महापालिकांच्या प्रशासनाला निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने तातडीने इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे हे आरक्षण पुन्हा अंमलात आणणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात आघाडी सरकारने या विषयात चालढकल चालविली आहे तर दुसरीकडे ओबीसींचे आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने महापालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी, ओबीसी समाज राजकीय आरक्षणपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नुकसानीला पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा दावाही त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात आयोगामार्फत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने संपूर्ण मदत केली तर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ही माहिती काही महिन्यात गोळा होऊ शकते आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नासाठी आयोगाला मदत करत नाही. राज्य सरकारच्या बेफिकीरीमुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आणि आता त्यांच्याच ढिलाईमुळे ते पुन्हा मिळत नाही, असा दावा प्रा. शिंदे यांनी केला.

जनगणना नव्हे, डेटा हवाय
सर्वोच्च न्यायालयाने निकालात ओबीसींची जनगणना नव्हे तर सर्वेक्षणाच्या आधारे गोळा केलेला इम्पिरिकल डेटा मागितला आहे. जनगणनेचे काम क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करणे हे कमी वेळाचे काम आहे. मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने लगेच काम सुरू केले असते तरी आतापर्यंत ते बरेचसे पूर्ण झाले असते. तरीही महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या जनगणनेवर अडून बसले आहे आणि विनाकारण हा प्रश्‍न गुंतागुंतीचा करत आहे. आता तर राज्य सरकारने या विषयात सर्वोच्च न्यायालयात याचिका करून आणखी गुंतागुंत करून ठेवली आहे, असे प्रा. शिंदे यांचे म्हणणे आहे.

COMMENTS