अहमदनगर जिल्ह्यात ऑगस्ट ,सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानी झाल्या आहेत . त्या नुकसानीची शासनाने कुठल्याह
अहमदनगर जिल्ह्यात ऑगस्ट ,सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानी झाल्या आहेत . त्या नुकसानीची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही . पाथर्डी ,शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली . नदी नाल्यांना पूर येऊन गावे ओस पडली आहेत .
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून देखील शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करून त्याचे पंचनामे करणे महत्त्वाचे आहे . परंतु ते शेतकर्यांनाच करायला भाग पाडत असल्याने शेतकऱ्यांना याची माहिती नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे ,
30 सप्टेंबर पर्यंत पिक पाहणीची मुदत असुन ती संपण्याआधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याने त्यावर तोडगा न निघाल्यास शिवसंग्राम पक्षाच्या वतीने जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे पाटील व तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी आ सांगितले ,
COMMENTS