नागपूरमध्ये एटीएसची कारवाई ;तिघांना घेतले ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरमध्ये एटीएसची कारवाई ;तिघांना घेतले ताब्यात

नागपूर : उत्तरप्रदेशातील धर्मांतर रॅकेटप्रकरणी यूपीतील एटीएसने मराठवाडयातील बीड जिल्ह्यातील एका युवकाला ताब्यात घेतल्यानंतर आता नागपूर येथील तिघांना

बिंग फुटण्याच्या भीतीने मनसुखची हत्या ; एनआयएच्या चौकशीत उघड; तपास दुस-याकडे सोपविल्याने भीती
असली बेबंदशाही ओबीसी खपवून घेणार नाही ! 
प्रभागातील विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य – आ.संग्राम जगताप

नागपूर : उत्तरप्रदेशातील धर्मांतर रॅकेटप्रकरणी यूपीतील एटीएसने मराठवाडयातील बीड जिल्ह्यातील एका युवकाला ताब्यात घेतल्यानंतर आता नागपूर येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. नागपुरातील गणेशपेठ परिसरात छापा टाकून प्रसाद रामेश्‍वर कांबळे, कौसर आलम शोकत अली खान व भूप्रियबंडो देवीदास मानकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर रॅकेट उघडकीस आणले होते. त्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,एटीएसने अटक केलेला प्रसाद हा गणेशपेठेतील राहुल कॉम्पलेक्समध्ये राहतो. तर, कौसर आलम हा झारखंडमधील धनबादमधील लोहिचारा येथील रहिवासी आहे. मानकार हा गडचिरोलीतील चामोर्शीतील वायगाव येथे राहतो. एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर करणारे रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणात गोमतीनगर पोलिस स्टेशनमध्ये धर्मांतर विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. एसटीएसने यावेळी अटकेतील आरोपींकडून एक डायरीही जप्त केली होती. यात महाराष्ट्र, केरळ, हरयाणा, आधंप्रदेश व दिल्लीतील रॅकेटच्या सदस्यांची नावे होती. तेही या कटात सहभागी झाल्याचे त्यावेळी निष्पन्न झाले होते. कांबळे हा दोन साथीदारांसह नागपुरातील घरी दडून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने राहुल कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये छापा टाकला. एटीएसच्या पथकाने प्रसाद, कौसर व मानकरला अटक केली. मध्यरात्रीच एटीएसचे पथक तिघांना घेऊन लखनऊकडे रवाना झाले.

COMMENTS