Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मनाई

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून  एका नोकरीच्या जाहिरातीत कंपनीत मराठी भाषिकांचे स्वागत नाही, या आशय

गरब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई : पो. नि..चंद्रशेखर यादव
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे अधिकृत करुण भूमिहीन गायरान धारकांना न्याय द्या : कॉ.प्रा.राम बाहेती
लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नवदाम्पत्याचा मृत्यू

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून  एका नोकरीच्या जाहिरातीत कंपनीत मराठी भाषिकांचे स्वागत नाही, या आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर या जाहिरातीचे सर्वत्र पडसाद उमटले. त्यानंतर आता मुंबईतील गुजराती मतदार अधिक असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भाषिक वाद उफाळून आला आहे. या मतदारसंघातील गुजराती बहुल सोसायटीमध्ये उमेदवारांचे पत्रक वाटण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

COMMENTS