सन २०१५ मध्ये धोकादायक पाण्याच्या टाकी पाडण्याबाबत पत्र आले होते परंतु
बेलापुर प्रतिनिधी : सन २०१५ मध्ये धोकादायक पाण्याच्या टाकी पाडण्याबाबत पत्र आले होते परंतु त्या पुर्वीच २०१४ मध्ये खास बाब म्हणून चार कोटी सतरा लाख रुपये किमतीच्या पाणी योजनेस जि प सदस्य शरद नवले यांनीच खोडा घातला असल्याचे पत्रक पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व माजी उपसरपंच रविंद्र खटोड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नाईक नवले व खटोड यांनी पुढे म्हटले आहे की गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी धोकादायक झाल्याचे लक्षात येताच सव्वा चार कोटीची पाणी पुरवठा योजना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री रणजित कांबळे यांच्याकडून मंजुर करुन आणली होती त्याची सर्व पूर्तता पुर्ण झाली होती परंतु ग्रामपंचायत निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन जि प सदस्य शरद नवले यांनी वाड्या वस्त्यावर पाणी पुरवठा करणे गरजेचे असुन फेर इस्टिमेट करावे असे लेखी पत्रच कार्यकारी अभियंता यांना दिल्यामुळे ते पाण्याच्या टाकीचे काम होवु शकले नाही हे सत्य लपवुन आपल्या बेजबाबदार पणाचे खापर दुसर्यावर फोडत आहे खरे तर गावासाठी पुर्णतः नविन योजना बनविने गरजेचे असताना पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे वापरुन काय साध्य होणार आहे पाण्याच्या नविन टाकी बरोबरच नविन साठवण तलाव वाँटर फिल्टर प्लँन सप्लाय फिल्टर प्लँन वाड्यावस्त्यावरील पाईप लाईन हे सर्व नविन योजनेत समाविष्ट होणे आवश्यक आहे हे सर्व सोडून जि प सदस्य आपली जबाबदारी झटकून आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहे या गावाला जि प सदस्य नवले यांनी किती निधी दिला ते तरी जाहीर करावे पाण्याची टाकी धोकादायक असल्याचे पत्र जिल्हा परिषदेने दिले मग ही बाब सदस्याला समजली नाही का मग ते पाच वर्ष शांत का बसले त्या पुर्वी सन २००८ मध्ये एक कोटी ४६ लाख खर्चाची पाणी योजना शरद नवले सरपंच असताना केली त्यात २३ लाख खर्चाचा फिल्टर प्लँंट होता तो कुठे गायब झाला आज गावाला खराब पाणी पुरवठा होतोय हे पाप कुणाचे आहे लोकांना खोटी अश्वासने देवुन सत्तेत आलात आता लोकांची कामे करा आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेवुन लढणे बंद करा असेही नवले नाईक खटोड यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
COMMENTS