Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित व विराट आयपीएलमधील महापुरुष ठरणार ?

 मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मोठी खेळी करून मुंबईला विजय मिळवू

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
रेणापूर येथे रुग्णालयात फळांचे वाटप
सीमा भागात फूट पाडण्याचे कारस्थान ः संजय राऊत

 मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मोठी खेळी करून मुंबईला विजय मिळवून दिलाच शिवाय अनेक विक्रमही प्रस्थापित केले. रोहितने आयपीएलमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या आहेत आणि विराट कोहलीनंतर असे करणारा तो केवळ दुसरा फलंदाज आहे. गुजरातविरुद्ध रोहितने ५० चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. रोहितच्या अर्धशतकाच्या मदतीने मुंबईने गुजरातविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली.

                 रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित कोहलीनंतर तो आयपीएलमध्ये सात हजार धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने आता आयपीएलमध्ये २७१ सामन्यांमध्ये ७०३८ धावा केल्या आहेत. रोहितने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, पण नंतर त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले आणि तेव्हापासून तो या फ्रँचायझीसोबतच आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच आयपीएल विजेतेपदे जिंकून दिली आहेत.  परंतु आता तो फक्त पूर्णवेळ फलंदाज म्हणून खेळतो.

                  हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा पहिला सक्रिय खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर ३०० षटकार नोंदलेले आहेत. विराट कोहली २९१ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर धोनी (२६४) आणि आंद्रे रसेल (२२३) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात दोन षटकार मारून रोहितने आयपीएलमध्ये ३०० षटकार पूर्ण केले. या सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो उत्तम फॉर्ममध्ये दिसला. त्याच वेळी, जर आपण एकूण विक्रमांबद्दल बोललो तर, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३५७ षटकार मारले आहेत. 

                रोहित आयपीएल प्लेऑफ सामन्यात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. रोहितने याबाबतीत सूर्यकुमार यादवला मागे टाकले, ज्याने २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नाबाद ७१ धावा केल्या होत्या. रोहितने यापूर्वी २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात ६८ धावा केल्या होत्या.

                रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विद्यमान आयपीएलच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून आसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या सामन्यात आरसीबी कोणत्या संघाशी सामना करेल हे १ जून रोजी कळेल. क्वालिफायर-२ मध्ये पंजाबचा सामना मुंबईशी होईल, जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी खेळला जाणार आहे, ज्यामध्ये आरसीबी १८ वर्षांचा दुष्काळ संपवून पहिली ट्रॉफी जिंकण्याचे ध्येय ठेवणार आहे. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

              रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि या सामन्यात किंग कोहलीला एमएस धोनीच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे.  विराट कोहलीही आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

                 आतापर्यंत त्याने या सत्रात १४ सामन्यांमध्ये ५५.८२ च्या सरासरीने आणि १४६.५४ च्या स्ट्राईक रेटने ६१४ धावा केल्या आहेत. विद्यमान आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली पाचव्या स्थानावर आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे विजेतेपद जिंकले तर विराट कोहली एका खास क्लबमध्ये सामील होईल, ज्यामध्ये भारताकडून सध्या फक्त एमएस धोनीचे नाव आहे.

                 धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने टी-२० विश्वचषक (२००७), एकदिवसीय विश्वचषक (२०११), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) आणि आयपीएल (२०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३) जिंकले आहेत. जर विराट कोहलीने या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली तर तो सर्व विजेतेपदे जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. फरक एवढाच असेल की धोनीने कर्णधार म्हणून जिंकले आहेत तर कोहली कर्णधार म्हणून वरील एकही स्पर्धा जिंकू शकला नाही.

                  कोहली हा एकदिवसीय विश्वचषक (२०११), टी२० विश्वचषक (२०२४) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३ आणि २०२५) च्या विजेत्या संघांचा घटक होता जर आरसीबी संघ आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकला तर किंग कोहली निश्चितच धोनीच्या खास क्लबमध्ये सामील होईल.

                अंतिम सामन्यात आरसीबी संघाला इतिहास रचण्याची आणि ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. यावेळी त्याच्या संघात एक खेळाडू आहे जो त्यांच्याकरीता ट्रम्प कार्ड ठरू शकतो. मनोरंजक गोष्ट म्हणजे हा खेळाडू सन २०१६ मध्ये आरसीबीसाठी खलनायक बनला आणि आरसीबीला अंतिम सामन्यात हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. खरं तर सन २०१६ च्या इंडियन प्रीमियर लीग फायनल अजूनही आरसीबी चाहत्यांसाठी एक वेदनादायक आठवण आहे. त्यांच्या घरच्या मैदानावर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना आणि विराट कोहलीच्या जबरदस्त फॉर्म असूनही, आरसीबीला सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) कडून ८ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्या अंतिम सामन्यात, भुवनेश्वर कुमारने एसआरएचसाठी त्याच्या अचूक आणि किफायतशीर गोलंदाजीने आरसीबीच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. त्याने ख्रिस गेल आणि विराट कोहली सारख्या खेळाडूंना धावा करण्यापासून रोखले आणि डेथ ओव्हर्समध्ये दबाव कायम ठेवला. त्या सामन्यात त्याने एकही विकेट घेतली नसली तरी, ४ षटकांत फक्त २५ धावा देऊन त्याने केलेल्या कामगिरीमुळे एसआरएचला कमी धावसंख्येचा बचाव करण्यास मदत झाली. त्या रात्री, भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीने आरसीबीचे विजेतेपदाचे स्वप्न भंग केले आणि तो निश्चितच त्या दिवशी आरसीबीचा ‘खलनायक’ होता.

रोहित शर्माने स्वतःच्या नेतृत्वात पाच टायटल्स मुंबई इंडियन्सला मिळवून दिले असून सन २००९ च्या आयपीएल सत्राचे विजेतेपद मिळविणाऱ्या डेक्कन चार्जर्स संघाचा तो सदस्य होता. तसेच त्याच्या नेतृत्वा टिम इंडियाने टि२० वर्ल्ड कप व चॅम्पियन्स टॉफी जिंकली असून, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात तो सन २००७ च्या टि२०व २०१३ चॅम्पीयन्स ट्रॉफीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा घटक होता. शिवाय त्याच्या नेतृत्वात भारत डब्ल्यूटीसी व वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. दुर्देवाने भारताला विजेतेपद मिळविता आले नाही. अन्यथा सर्व नामांकीत स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार व खेळाडू ठरला असता. तरीही तो आपल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले तोही क्रिकेटच्या महापुरूषांत गणला जाईल.

@ डॉ.दत्ता विघावे                        

    क्रिकेट समिक्षक 

COMMENTS