राष्ट्रपती निवडणुकीत आघाडीच्या 16 आमदारांची मते फुटली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रपती निवडणुकीत आघाडीच्या 16 आमदारांची मते फुटली

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील 16 आमदारांची मतं फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह

नेत्र पिढीच्या स्थापनेमुळे नेत्रदान चळवळीला गती मिळेल ः डॉ. सुधा कांकरिया
स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला
कृषी विभागाची कृषी मॉल संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच : जयंत पाटील

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील 16 आमदारांची मतं फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षाने मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद पवारांची खेळी फसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तब्बल 16 आमदार फुटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच नव्हती तर देशभरातून अनेक मते फुटल्याचे समोर आले आहे.
भाजपने मुर्मू यांच्या विजयासाठी मोठी तयारी केली होती. देशभरातून विचार करता 104 आमदारांची मत फुटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. कोणत्या राज्यातून किती मतं फुटली? छत्तीसगडमधून 6 आमदार झारखंडमधून 10 आमदार आसामचे 22 आमदार तर देशभरातून 17 खासदार फुटल्याचंही समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांचा 200 मतांचा दावा योग्य ठरला? या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या एकत्रित बैठकीत द्रौपदी मुर्मु यांना राज्यातून 200 मतं मिळतील, असा अंदाज शिंदेंनी व्यक्त केला होता. त्यात भाजपा 106, शिंदे गट 50 असून एकूण 170 जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची 16 मतेही राष्ट्रपती निवडणुकीत मूर्मुंना मिळाली होती. हा सगळा आकडा 185 च्या आसपास जातो. 200 चा आकडा शिंदे यांनी सांगितला होता. या निवडणुकीत एकूण 4800 निर्वाचित खासदार आणि आमदारांनी भाग घेतला. निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या आहेत. यांच्यानिमित्ताने देशात पहिल्यांदा एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसल्या आहेत.
27 पक्षांच्या समर्थनासह मुर्मू यांना मोठे मतदान होणार असल्याचे सांगितले जात होते. तर दुसरीकडे सिन्हा यांना 14 दलांचे समर्थन आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी द्रौपदी मुर्मू विजयी होतील, असे म्हटले होते. भाजप-शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे आमदारही त्यांना मतदान करतील, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षमर्यादा सोडून किंवा पक्षादेश झिडकारून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता.

COMMENTS