Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मला अडकवण्यासाठी परमबीर सिंहांचा वापर

अनिल देशमुखांचा आरोप ः बक्षीस म्हणून त्यांचे निलंबन मागे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना, तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी र

अनिल देशमुखांना जामीन मंजूर
खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून येणारा तो एनडीएचा पदाधिकारी
अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना, तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी देशमुखांना मंत्रिपदावरून गच्छंतीसोबतच त्यांना अटक करण्यात आली होती, आता ते जामीनावर असून, मला अडकवण्यासाठी परमबीर सिंहांचा वापर केल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
देशमुख म्हणाले, आता राज्यात जे सरकार आहे, त्या सरकारनेच मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर केला. याचे बक्षिस म्हणून नंतर त्यांचे निलंबन मागे घेतले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा मी उचलणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत यावर सविस्तर भूमिका मांडेल. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याप्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी म्हटले आहे की, परमबीर सिंह यांना देशमुखांच्या विरोधात प्यादे म्हणून वापरले गेले. फडणवीसांनी आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी कट केला होता. त्यामुळेच सरकारने तांत्रिकदृष्ट्या कॅटच्या फेर्‍यातून परमबीर सिंहला बाहेर काढले. नाना पटोले म्हणाले, परमबीर सिंह यांच्याआधी देवेंद्र फडणवीसांनीच गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुखांच्या प्रकरणात 100 कोटींचा हिशोब शेवटपर्यंत लागलाच नाही. ते आणले कुठून, हा प्रश्‍न तेव्हाही निर्माण झाला होता आणि परवा परमबीर सिंह यांच्या बाबतीत देण्यात आलेल्या आदेशात उच्च न्यायालय आणि कॅटच्या आदेशाचेही पालन करण्यात आले नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांचे निलंबन शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. परमबीर सिंह यांचे पोलिस दलातील बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. तत्पूर्वी तत्कालिन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे सांगितले होते.

COMMENTS