Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचा आर-पारचा इशारा

फडणवीसांविरोधात थोपटले दंड भाजप-ठाकरे गटात संघर्ष होणार तीव्र

मुंबइ : विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्

मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले; उध्दव ठाकरे यांचा आरोप
भाजपचे हिंदूत्व गोमूत्रधारी – उद्धव ठाकरेंची टीका
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर

मुंबइ : विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल चढवतांना म्हटले की, आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत. अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषण ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होते, ते सगळे मी केले.

हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळे दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. आताही ज्या कोणाला जायचे असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचे असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. अरे तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितले आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिले की, माझे सगळे नातेवाईक माझ्यासमोर आहेत. यातना होणे स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुखांनी सांगितले की, कसे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळे सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपला दिला आहे.

उद्धव ठाकरे लोकशाहीच्या लढाईत कौरवांच्या बाजून े: मुनगंटीवार – महाभारतात कर्णाने अर्जुनाला असाच इशारा दिला होता, इथेही असेच काहीसे घडत असल्याची  प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर्ण हा पांडवांचा भाऊ होता. इतिहासाची पुनरावृत्ती होते. बाळासाहेब ठाकरे कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नव्हते. काँग्रेससोबत ज्या दिवशी जावे लागेल, त्यादिवशी मी माझे दुकान बंद करेन, असे त्यांनी म्हटले होते. पण दुर्दैवाने जी कर्णाची भूमिका दुर्योधनाच्या आणि कौरवाच्या बाजूने जाण्याची होती, ती भूमिका उद्धवजींनी या लोकशाहीच्या युद्धात घेतली आहे. कर्ण ज्याप्रकारे अर्जुनाला उद्देशून बोलायचा, एकतर तू राहशील किंवा मी राहीन, तीच भाषा, तोच भाव, तीच कथा, तोच प्रसंग हे आपण आता लोकशाहीच्या युद्धात पाहत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

COMMENTS