Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला पदभार; अन्न-औषध प्रशासन विभागाची धुरा खांद्यावर

मुंबई : राज्य प्रशासनातील कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आल

राज्यभरात एफडीएची (FDA) धडक मोहीम; ७३ लाखांचा औषध साठा जप्त, आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती
चकलांब्यात अन्न भेसळीचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्षतुकाराम मुंढे साहेब, चकलांब्यातही धडक मोहीम राबवा – नागरिकांची मागणी
चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा

मुंबई : राज्य प्रशासनातील कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडे ‘अन्न-औषध प्रशासन’ (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या कारकिर्दीतील ही २५ वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या पदावर दीड महिनाही पूर्ण होण्यापूर्वी राज्य सरकारने त्यांची नव्या विभागात नियुक्ती केली. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत.

अन्न-औषध प्रशासन विभागावर मागील काही काळात गैरव्यवहार, लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अशा परिस्थितीत तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कठोर प्रतिमेच्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी आल्याने मोठ्या प्रशासकीय बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली होती. या मोहिमेत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या या निर्णयामुळे राज्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, दिव्यांग विभागातील कारवाई वेगात सुरू असतानाच मार्च महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्या कारवाईचा वेग कमी झाल्याची चर्चा होती.

आता नव्या विभागात रुजू होताना भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभार उभा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे अन्न-औषध प्रशासन विभागात पुढील काळात कोणते कठोर निर्णय घेतले जातात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS