Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरात 24 तासामध्ये तिघांची हत्या

नागपूर ः वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे. उपराजधानी नागपुरात 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली. तस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा
अरिहंत भगवान मूर्तीच्या अखंड शिलेचे नगरमध्ये स्वागत ; सामूदायिक शांतीमंत्र पठणात पुष्पहार अर्पण
श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे नदी संवाद यात्रेचा प्रारंभ

नागपूर ः वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे. उपराजधानी नागपुरात 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली. तसेच जीवघेण्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या गंभीर विषयावर ट्वीट करत राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली की नाही असा संतप्त सवाल करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकस्त्र सोडले आहे.

COMMENTS