Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाथ पंथी डवरी गोसावी समाजात जात पंचायत नाही

पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत खोटी तक्रार करणार्‍यावर कारवाईची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः नाथ पंथी डवरी गोसावी समाज्यातील  कांही विघ्नसंतोषी लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे जात पंचायत होत असल्याची लेखी तक्रार

इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; आ.विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केला प्रश्न उपस्थित
नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपणसाईयोग फाउंडेशनचा हरित उपक्रम ; राहात्यात १२ फूट वटवृक्षाची लागवड
मालिकांच्या राजीनाम्यासाठी अहमदनगरमध्ये भाजपचे आंदोलन | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः नाथ पंथी डवरी गोसावी समाज्यातील  कांही विघ्नसंतोषी लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे जात पंचायत होत असल्याची लेखी तक्रार केली होती ती तक्रार खोटी व समाज्याची बदनामी करणारी असल्याने तक्रारदार मोहन भगवान चव्हाण  याच्याविरुद्ध कारवाई व गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड यांचे नेतृत्वाखाली नाथ पंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देवून करण्यात आली.
 4 जुलै 2016 रोजी घोडेगाव ता.नेवासा येथे समाजबाधवांचा राज्यव्यापी मेळावा अशोक गायकवाड यांचे उपस्थितीत घेऊन जात पंचायत प्रथा बरखास्त करून संविधान व कायदा याचे पालन करण्याचे सर्वानुमते ठरले असतांना समाजातील जेष्ठ व्यक्ती नाथा नारायण बाबर व इतर पाच ते सहा लोकांच्या बद्दल खोटी तक्रार  करणारा मोहन चव्हाण यांच्यावर  कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाथ पंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड, रवी आल्हाट, सुनील सावंत, नाथा बाबर आदींसह नाथ पंथी डवरी गोसावी समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS