देवळाली प्रवरा ः पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात

देवळाली प्रवरा ः पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, त्यांच्या पालकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही माझ्या मुलाच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणार्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा अशी मागणी शरद पवार गटाच्या सोनाली तनपुरे यांनी केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या अलिशान कारने दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि न्यायव्यवस्थेने घेतलेल्या अनाकलनीय भूमिकेनंतर सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. पुण्यासह राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. या सगळ्या घडामोडींनंतर आता ब्रह्मा कॉर्पचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि एकूण कुटुंबाविषयी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. या घटनेनंतर जयंत पाटील यांचे भाचे आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. सोनाली तनपुरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणार्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सत्ताधारी गटाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर पोलिसांना क्लीनचीट दिली आहे. राज्यकर्त्यांचे राजकारण चालणार आहे. परंतू या कुटुंबांना न्याय मिळायला हवा. अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे.
COMMENTS