Homeताज्या बातम्यादेश

’अग्निवीर’ विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने अग्निपथला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे केंद्राच्या या योजनाचा मार्ग मोक

दूधगंगा गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापक अटकेत
अखेर लालपरी धावली; संपानंतर 151 एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल
सातार्‍यातील पुढील वर्षीचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्याने : ना. शंभूराज देसाई

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने अग्निपथला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे केंद्राच्या या योजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ही योजना आणण्याचा उद्देश देशाच्या सैन्याला उत्तम पद्धतीने तयार करणे हा आहे आणि ते देशाच्या हिताचे असे मत न्यायालायने याचिका फेटाळताना म्हटले आहे. दुसरीकडे जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची याचिका फेटाळत ही मागणी न्याय्य नसल्याचे म्हटले आहे.अग्निपथ योजनेला आव्हान देणार्‍या याचिका देशाच्या विविध भागांत दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग केली होती. अग्निवीरच्या विरोधातील सर्व याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयातील सरन्यामूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यात या खंडपीठाने अग्निपथला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या याचिकावरील निर्णय सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने 15 डिसेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज अखेर या याचिकांवर न्यायालयाने निकाल दिला आहे.दाखल याचिकांवर युक्तिवादात केंद्राने अग्निपथ योजना ही संरक्षण भरतीमधील सर्वात मोठ्या धोरणात्मक बदलांपैकी तसेच भरती प्रक्रियेतील हा मोठा बदल असेल असे नमूद केले होते. 

COMMENTS