Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

मनोज जरांगे यांची जालन्यातून घोषणा

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाल्यानंतर आणि मनोज जरांगे यांनी जालन्यात धडक दिल्यानंतर राज्यसरकारने अधिसूचना काढली. त्यानंतर मनोज जरांगे यांन

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
कार्तिकी महापूजा मनोज जरांगेंच्या हस्ते व्हावी
आत टाकून दाखवाच, लाट काय असते कळेल ?

जालना ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाल्यानंतर आणि मनोज जरांगे यांनी जालन्यात धडक दिल्यानंतर राज्यसरकारने अधिसूचना काढली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित करत, मुंबईतून जालन्यात प्रस्थान केले. जालन्यात पोहचल्यानंतर रविवारी माध्यमांना संबोधित करतांना मनोज जरांगे म्हणाले की, अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर होऊन त्या कायद्याअंतर्गत एकाला तरी मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार आहे. जरांगे यांनी म्हटले की, नव्या कायद्यांतर्गत एकाला तरी लाभ मिळाला तर या आंदोलनाचे पुढे काय करायचे ते ठरवू. या आंदोलनाबाबत मराठा समाजाला गाफील राहून चालणार नाही. ज्यांच्या  कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना लाभ मिळाला पाहिजे तसेच त्यांच्या सग्या सोयर्‍यांना देखील सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. ते मिळेपर्यत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. सोमवारी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले आहे. शेवटच्या मराठ्याला आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नसल्याचे जरांगे म्हणाले. नोंदी सापडलेल्यांसोबतच त्यांच्या सगे सोयर्‍यांनाही प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची सरकारने अंमलबजावणी करावी. नोंद मिळालेल्या सगेसोयर्‍याला ओबीसी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर खरा गुलाल उधळु, विजय साजरा करु असे जरांगे म्हणाले. मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन शांतेत पार पडले. त्याच पार्श्‍वभूमीवर सगळ्यांचे मला फोनही आले.  सर्व जण शांततेत मुंबईला आले व आंदोलनानंतर आपल्या घरी परतले. त्यांचे मनापासून कौतुक. यामध्ये सगेसोयरे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्या शब्दासाठी सरकारने 15 दिवस लावले. हे अध्यादेशाचे परिपत्रक आहे. त्यामुळे याबाबत गाफिल राहून चालणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

COMMENTS