नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कथित भडकाऊ भाषण केल्याबद्दल झारखंडच्या बोकारो न्यायालयाने समन्स बजावले होते. मात

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कथित भडकाऊ भाषण केल्याबद्दल झारखंडच्या बोकारो न्यायालयाने समन्स बजावले होते. मात्र ते दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने या संदर्भात निर्णय दिला. विश्वास आणि धर्माबाबत बोलताना अधिक सावधगिरी बाळगावी लागते. त्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या विचारांना धक्का लावता येत नाही किंवा चिथावणी दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
COMMENTS