Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिका

पिंपरी : देशभरातील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण न

विजयादशमी : वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतीक !
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिर्डीच्या विश्‍वस्तांसाठी नियमात केला बदल – पालकमंत्री मुश्रीफ

पिंपरी : देशभरातील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्च न्यायालयात ही याचिका फेटाळली जाईल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूतील जल्लिकट्टू आणि कर्नाटकातील कंबाला या रेड्यांच्या शर्यतींना दिलेल्या परवानगीचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका ‘द पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ निमल्स’ (पेटा) संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

COMMENTS