Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा – क्षीरसागर

पाथर्डी/प्रतिनिधी ः पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील मालकी हक्काबाबतचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद,

राहात्यातील विद्यार्थ्यांची मर्दानी खेळांसाठी निवड
तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त l DAINIK LOKMNTHAN
संवत्सरचे सुनील भाकरे यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड

पाथर्डी/प्रतिनिधी ः पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील मालकी हक्काबाबतचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद,शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणामुळे होणारे वाद,शेती वहिवाटीचे वाद,भावा -भावांतील वाटणीचे वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमिनीचे वाद शेतकर्‍यामध्ये आहेत.हे सर्व वाद मार्गी लावण्यासाठी महसूल विभाग आणि वनविभाग यांच्या माध्यमातून  सलोखा योजना’ राबवण्यात येत असून याचा शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी प्रांत अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी केले आहे.

सदर वाद संपुष्ठात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांनी  एका शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे असणा-या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची   सलोखा योजना राबविण्यात येत आहे.

एका शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा  दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे असणा-या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रुपये अंकी 1000/-(अक्षरी एक हजार रुपये मात्र) व नोंदणी फी नाममात्र रुपये अंकी 1000/- (अक्षरी एक हजार रुपये मात्र) आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना शासन निर्णय क्रमांक/मुद्रांक/2022/प्र.क्र.93/म-1 (धोरण) दिनांक 3 जानेवारी 2023अन्वये राबविण्यात येत आहे.

अदलाबदल दस्त नोंदणीवेळी शेतक-यांनी पंचनामा दस्तास जोडणे आवश्यक राहील.  सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग, सत्ताप्रकार, पुनर्वसन/आदिवासी, कुळ इ. सर्व बाबी विचारात घेवुन दोन्ही शेतकरी यांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे अशी अट दस्तात नमुद करणे आवश्यक राहील. या योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुस-याकडे व दुस-याचा ताबा पहिल्याकडे असणा-या दोन्ही बाजुकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी सर्व शेतकरी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  सलोखा योजना अंमलात येण्यापुर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.अकृषिक (बिनशेती) रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागु असणार नाही.पहिल्या शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश होणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही. सदर योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा झाल्यास आपले गावातील तलाठी यांच्याकडे अर्ज करावे लागेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी … – एका शेतकर्‍याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसर्‍या शेतकर्‍याकडे व दुसर्‍या शेतकर्‍याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकर्‍याकडे असणार्‍या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासुन दोन वर्षाचे आत आपणास लाभ घेता येईल. सदर योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा झाल्यास एका शेतकर्‍याच्या शेतजमिनीचा ताबा दुसर्‍या शेतकर्‍याकडे व दुसर्‍या शेतकर्‍याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकर्‍याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे. एकाच गावात जमीन धारण करणार्‍या शेतकर्‍यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असलेबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा हा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहीत पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे व लाभ घेवू इच्छिणार्‍या शेतकरी बांधवानी हा पंचनामा तलाठी यांचे जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र तलाठी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे लागेल.

COMMENTS