बुलढाणा प्रतिनिधी - कोरोनाच्या तीन वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथील यात्रा होत असल्याने या यात्रे करिता संपूर्ण देशभरातून भाविक ला

बुलढाणा प्रतिनिधी – कोरोनाच्या तीन वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथील यात्रा होत असल्याने या यात्रे करिता संपूर्ण देशभरातून भाविक लाखोच्या संख्येने येत असतात. त्यामुळे भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अतिरिक्त बसेस ची व्यवस्था करण्यात आली असून, 4 मार्च ते 16 मार्च या कालावधीमध्ये बुलढाणा आगारातून जवळपास दोनशे अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. अकोला, औरंगाबाद, जालना, जळगाव यासह इतर जिल्ह्यातून 500 ते 600 बसेस सोडण्यात येणार आहेत.
सोबतच प्रवाशांच्या सुविधेसाठी पिंपळगाव सराई, ढासाळवाडी आणि वाघजाळी अशा तीन ठिकाणी तात्पुरते बस स्थानक देखील उभारण्यात आले आहेत.
COMMENTS