Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पंतप्रधान म्हणाले शेतकऱ्याचे उत्पन्न दुपट्ट होणार परंतु आत्महत्याच दुपट्ट झाले – हरिभाऊ राठोड 

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी -  छत्रपती संभाजीनगर शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा पक्

दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले
ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचे सातारा येथे निधन
भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी –  छत्रपती संभाजीनगर शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा करण्यात आला यावेळी खासदार हरिभाऊ राठोड हे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेड आम आदमी पार्टी व इतर कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले.

सर्व सामान्य शेतकारी जो हवालदिल झाला आहे त्याला आधार देणं हे पार्टिचे उद्देष्ट आहे असे हरिभाऊ राठोड म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले होते शेतकर्यांचे उत्पन्न दुपत्त होणार दुपत्त तर झाल नाही परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपट्ट झाल्या. 2013 ते 2022 चे आकडे बघितल्यास पुर्वीच्या आत्महत्या पेक्षा दुपट्ट आत्महत्या झाल्या आहेत. सरकार म्हणजे कल्याणकारी राज्य असायला पाहिजे असे माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले 

के. चंद्रशेखर राव यांना देवतुल्य व्यक्ती म्हंटले तरी चालेल त्यांच्या विचारातून भारत राष्ट्र समिती पक्ष पुढे जात आहे. सुखी संपन्न महाराष्ट्र करायच असल्यास भारत राष्ट्र समितीच्या पाठीमागे मजबूतीने उभं रहावं लागेल.  तसेच बी.आर.एस पार्टीमध्ये अनेक मोठमोठे नेते सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यावेळी दिली.  

COMMENTS