Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दत्त शुगर कारखान्यातील प्रदुषणामुळे साखरवाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

फलटण / प्रतिनिधी : मौजे साखरवाडी तालुका फलटण येथील परिसरात प्रदूषणाचा टक्का वाढला. नागरिक दमा खोकल्याच्या आजाराने त्रस्त साखरवाडी तालुका फलटण येथ

नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर
विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी
बोगस वियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करा

फलटण / प्रतिनिधी : मौजे साखरवाडी तालुका फलटण येथील परिसरात प्रदूषणाचा टक्का वाढला. नागरिक दमा खोकल्याच्या आजाराने त्रस्त साखरवाडी तालुका फलटण येथील सध्या उसाच्या हंगामामुळे वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्या रस्त्यावर काजळी व बग्यास पसरत आहे. एकंदरीतच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत असताना या धुळीमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दत्त शुगर साखर कारखाना साखरवाडी या कारखान्याच्या बॉयलरमधून पांढरे काळे धूलीकण हवेमध्ये पसरत आहेत. संपूर्ण परिसरात या धूलीकणांचे साम्राज्य माजले आहे. घराघरात घराच्या छतावर गाड्यांचे टपावर दुकानात या कणांचा राक्षस आपले साम्राज्य पसरवत चालला आहे. नागरिकांच्या नाकातोंडात डोळ्यात अडकणार्‍या काळ्या-पांढर्‍या काजळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सततच्या हवेमध्ये उडणार्‍या काजळीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
नागरिकांना रस्त्या रस्त्यातून वाहने चालवताना डोळ्यांमध्ये अचानकपणे येणार्‍या काजळीचा मोठा धोका संभवतो आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही सामान्य नागरिकांना याचा खूप त्रास होत असताना याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. यामुळे घराघरात सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून तेथील डॉक्टरांना रुग्णांना सेवा देताना नाकीनऊ येत आहे.
साखरवाडीची लोकसंख्या विचारात घेता दवाखाने ही कमी पडू लागले आहेत. त्यामुळे सध्या येथील डॉक्टर व मेडिकल दुकानांची या प्रदूषणामुळे चलती असल्याची चर्चा आहे. परंतू सामान्य नागरिकांना शारीरिक व आर्थिक ताण सहन करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही, असे असताना प्रदूषण नियंत्रण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
साखरवाडी परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे रात्रंदिवस अक्षरशः लोकांना घराची दारे लावून बसावे लागत आहे. शेतात काम करणार्‍या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांचा संपूर्ण अवतारच बदलला जात असून मजूर वर्गाला काम करताना पिकावरील पडलेल्या काजळीचा मोठा धोका संभवत पिकावरील पडणार्‍या काजळीमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांच्या पानांमधून होणारे प्रकाश संशोलनाचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे याचा परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होत आहे.
आधीच करोनाचा धोका त्यात गावांमध्ये वाढलेले प्रदूषण यामुळे येथील परिसरातील नागरिक शारीरिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चालले आहे. या वाढत्या प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट होत चालला आहे. नागरिक मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. शिवाय येथील बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांना या प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे. दुकाना-दुकानातून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कारखान्याच्या बॉयलर मधून उडणार्‍या काळ्या-पांढर्‍या धूलीकणांचे कापड व किराणा इ. दुकानातून हवेतून पडणार्‍या काजळीचा परिणाम त्यांच्या मालावर दिसून येत आहे. त्यामुळे मालाची प्रत खराब होत असताना दुकानदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
रस्त्या-रस्त्यावर काजळीचे थरच्या थर साठले आहेत. येणार्‍या जाणार्‍यांना वाहनामुळे याचा धुरळा बोलण्याच्या पलीकडला आहे. अशी परिस्थिती राहिल्यास भविष्यात नागरिकांना दत्त शुगर कारखान्याचा परिसर सोडून जावे लागणार यात शंका नाही. तरी प्रदूषण नियंत्रण विभागाने याचा लवकरात-लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
चौकट:
प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी साखरवाडी कारखान्याच्या प्रदूषणाकडे आर्थिक हितापोटी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. साखरवाडीत जल व वायू प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकार्‍यांच्या विरोधात कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.

COMMENTS