नवी दिल्ली ः आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. या धोकादायक परिस्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास

नवी दिल्ली ः आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. या धोकादायक परिस्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ’ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदानमधील बंदरावर पोहोचले आहेत.
COMMENTS