Homeताज्या बातम्यादेश

नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात

लातूरमधून दोन शिक्षकांना एटीएसने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : नीट परीक्षेमध्ये मोठा गैरव्यवहार उघड झाला असून, आरोपीने एका विद्यार्थ्यांकडून तब्बल 30-40 लाख रूपये घेतल्याचे उघड झाले आहे. या नीट प

ओबीसी आरक्षण… केंद्र सरकारच पितळ उघड… इतके दिवस महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं…
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एमईटीचे महत्त्वपूर्ण पाऊल 
धनगरांच्या एसटी आरक्षणास आमदारांचा विरोध

नवी दिल्ली : नीट परीक्षेमध्ये मोठा गैरव्यवहार उघड झाला असून, आरोपीने एका विद्यार्थ्यांकडून तब्बल 30-40 लाख रूपये घेतल्याचे उघड झाले आहे. या नीट परीक्षेच्या गैरव्यवहारावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात असतांना, याप्रकरणी नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी नांदेेड एटीएसने लातूरमधून दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे नीट परीक्षा गैरव्यवहारामध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांना लाभ तर मिळाला नाही ना, असा सवा उपस्थित होत आहे. आणि जर लाभ मिळाला असेल तर ते विद्यार्थी कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी एनटीएच्या संचालकांना बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असतांना सीबीआयच्या पथकाला बिहार कनेक्शन मिळाले होते. यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. नांदेड एटीएसने लातूर येथे कारवाई करत दोन शिक्षकांना अटक केली आहे. यातील एक शिक्षक हा लातूर तर दूसरा हा सोलापूर येथे काम करतो. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. संजय तुकाराम जाधव व जलील उमरखाँ पठाण अशी अटक करण्यात आलेल्या या या शिक्षकांची नावे आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेसाठी देशभरातील मुले तयारी करत असतात. दरम्यान, . लातूरमध्येही नीट व जेईईची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मोठ्या प्रमाणात खसगी कोचिंग क्लासेसची संख्या या ठिकाणी आहे. याच दृष्टीने एटीएसचे पथक हे तपास करत असतांना शनिवारी रात्री वरील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील असून ते सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर लातूरच्या येथील अंबाजोगाई रोड येथे राहणारे जलील उमरखाँ पठाण हे लातूर येथील कातपूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते. सध्या त्यांना पथकाने नांदेड येथे नेले असून त्या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे.

नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली – रविवारी (30 जून) रोजी होणारी नीट-पीजी प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मंत्रालयाकडून जारी निवेदनात म्हटले आहे की, काही स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहेत. या घटना लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मेडिकलसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून आयोजित एनईईटी-पीजी प्रवेश परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS