Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू ः आ. रोहित पवार

कर्जत। प्रतिनिधीः कांद्याचे सातत्याने ढासळणारे भाव आणि त्यावरुन शेतकर्‍यांना होणारा त्रास लक्षात घेता ’नाफेड’ कडून सध्या कांदा खरेदी केली जात आहे

केंद्रीय संस्थाचा वापर आवाज दाबण्यासाठी होत आहे- आ. रोहित पवार
रोहित पवारांचा मंत्री पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानी चा दावा
आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी

कर्जत। प्रतिनिधीः कांद्याचे सातत्याने ढासळणारे भाव आणि त्यावरुन शेतकर्‍यांना होणारा त्रास लक्षात घेता ’नाफेड’ कडून सध्या कांदा खरेदी केली जात आहे. कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांत सातत्याने कमी होत असल्याने कर्जत,जामखेड तालुक्यात जवळपास 1 हजार मेट्रीक टन कांदा नाफेड हे खरेदी करत आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करून कर्जत,जामखेड मतदारसंघात विविध ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले आहेत. त्याचा फायदा हा आतापर्यंत शेतकर्‍यांना होतच आला आहे. त्याच खरेदी केंद्रातून आताची ही कांदा खरेदी होत आहे.  
कर्जत तालुक्यातील दोन ठिकाणी ही कांदा खरेदी केली जात आहे. गुरव पिंप्री आणि मुळेवाडी याठिकाणी जवळपास 1 हजार मेट्रीक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. या खरेदीचा शेतकर्‍यांना फायदा व्हावा. त्यासाठी शेतकर्‍यांनी आपले आधार कार्ड, सातबारा आणि पासबुक हे गुरव पिंप्री किंवा मुळेवाडी येथील खरेदी केंद्रावर जमा करायचे आहेत.  याअगोदरही दोन महिन्यांपूर्वी कांद्याची खरेदी ही खरेदी केद्रांद्वारे करण्यात आली होती. सध्या बाजारात कांद्याला मिळणारा भाव हा अतीशय कमी झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यातच सरकारकडून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना केवळ झुलवत ठेवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता नाफेडद्वारे कांदा खरेदी होत असली, तरी यातून फार काही शेतकर्‍यांना फायदा होईल. असे वाटत नाही.असं आ. रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी बाजारभाव कमी झाल्यानंतर नाफेडद्वारे कांदा खरेदी करावी. यासाठी आ. रोहित पवार यांनी याअगोदरही विधानसभेत मुद्दा उपस्थित करून तसेच प्रत्यक्ष मंत्री, अधिकारी यांना भेटून नाफेडद्वारे कांदा खरेदी करावी. अशी विनंती वेळोवेळी केलेली आहे. परंतु नाफेडमार्फत कांदा खरेदी केला जातो. तेव्हा कांद्याचे निर्यातक्षम गुणवत्तेचे निकष असतात. या निकषाने नाफेड खरेदी करणार असेल. तर बाजाराच्या सरासरी 2,410/- रुपये दरानेच खरेदी का? बाजाराच्या उच्चांकी 2,800/-रुपये प्रति क्विंटल अशा दराने खरेदी का केली जात नाही?, असा प्रश्‍नदेखील आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. चांगला भाव मिळेल या आशेने शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेल्या कांद्यांपैकी 30 ते 40 टक्के कांदा हा खराब झाला आहे. चांगला भाव मिळाला असता, तर हे नुकसान भरून काढता आलं असतं. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात प्रत्येकी दोन असे धान्य खरेदी केंद्र होते. पण दोनच केंद्र असल्याने शेतकर्‍यांना तूर, उडीद अथवा हरभरा विक्रीसाठी जास्त अंतर पार करून जावं लागत होतं. त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वाढत होता. आणि माल घेऊन गेल्यानंतर मर्यादित केंद्र असल्याने आठ-आठ दिवस शेतकर्‍यांना वाट पाहावी लागायची. आणि  त्यात मोठी गैरसोय शेतकर्‍यांची होत होती. त्यानंतर आ. रोहित पवार यांनी शेतकर्‍यांना फायदा व्हावा. त्यासाठी जामखेड तालुक्यात 5 आणि कर्जत तालुक्यात 7 अशी एकूण 12 खरेदी केंद्र नाफेडच्या अधिकार्‍यांना बोलून सुरू करून घेतली. यामुळे आता शेतकर्‍यांना आठ दिवस वाट पाहण्याची देखील गरज राहिली नाही. आणि केंद्राची संख्या वाढल्याने शेतकर्‍यांनीही आपले धान्य व्यापार्‍यांना न देता हमीभाव केंद्रात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यास पसंती दर्शवली आहे.

नाफेडच्या या खरेदीला विरोध असला. तरीही शेतकर्‍यांना फायदा व्हावा. यासाठी आपण ही केंद्र सुरू करून घेतलेलीे  आहे. त्यासाठी जामखेड तालुक्यात 5 आणि कर्जत तालुक्यात 7 अशी एकूण 12 खरेदी केंद्र नाफेडच्या अधिकार्‍यांना बोलून सुरू करून घेतली. -आ.रोहित पवार.

COMMENTS