छ.संभाजीनगर ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत. निजाम सरकारच्या काळात द

छ.संभाजीनगर ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत. निजाम सरकारच्या काळात देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा महायुती सरकारमध्ये मिळाला, असे म्हणत सरकार मुस्लिम समाजासाठी काम करत आहे, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. दरम्यान अब्दुल सत्तार पुढे बोलताना म्हणाले की, सध्या फक्त मुख्यमंत्री शिंदे यांची हवा आहे. मी पैलवान असून कुणासोबत तरी लढायचे आहे. मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली असून आम्हाला योग्य न्याय मिळेल असा विश्सवासही सत्तारांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS