Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये विहिरीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

 औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बह

खा. भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन भेट ; भेट देण्यामागे नेमके “खास” कारण काय?
गोदावरी अभ्यास गटाने चार आठवड्यात अहवाल तयार करावा उच्च न्यायालयाचे आदेश : आ. आशुतोष काळे
औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर

 औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह घराजवळील विहिरीत आढळले आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथून बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणी मागील 3 दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. आज सकाळी दोघींचे मृतदेह हे घराजवळील विहिरीतील पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दत्तू बाबुराव चव्हाण हे शेतात राहतात. त्यांच्या दोन मुली स्वाती दत्तू चव्हाण (19) आणि शितल दत्तू चव्हाण (15) या बेपत्ता असल्याची तक्रार १४ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

COMMENTS