Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय बाबाजी परिवाराने राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी केले विशेष ध्वजारोहण 

राज्यभरातील भाविक नाशिकला करणार नातेवाईक संपर्क अभियान

नाशिक प्रतिनिधी - अध्यात्मिक उन्नती ते राष्ट्र कल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देव-धर्म कार्याबरोबरच देशभक्तीसाठी  मि

हलगर्जीपणाचे बळी
देश 2047 मध्ये प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरेल
 छत्रपती संभाजी नगरचे मुख्य रस्ते बनली सेल्फी पॉईंट

नाशिक प्रतिनिधी – अध्यात्मिक उन्नती ते राष्ट्र कल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देव-धर्म कार्याबरोबरच देशभक्तीसाठी  मिशन ‘राजकारणाचे  शुद्धीकरण’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी धर्म ध्वजाचे ध्वजारोहण साधू-संत व भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले.या महत्वपूर्ण व अनोख्या ध्वजारोहण सोहळ्यास नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राज्यभरातील भाविक बाबाजींच्या विजयासाठी  नाशिक येथे मतदारांच्या भेटी बरोबरच मुख्यतः नातेवाईक संपर्क अभियान राबवणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

            निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरनेने जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाच्या शुद्धीकरणाची मोहीम राबविली जात आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे.राज्यभरातील मतदारांना देशभक्त व  निष्काम सेवा करणाऱ्या उमेदवारांनाच विजयी करण्याचे आवाहन भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.ओझर येथील जनशांती धाम येथे राजकारणाच्या शुद्धीकरणासाठीच्या या मोहीमेचे ध्वजारोहण साधू-संत,मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ब्रह्मचारी विष्णू महाराज,ब्रह्मचारी रामानंदजी महाराज यांनी भक्त परिवाराची भूमिका स्पष्ट केली. आज देशभरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.विकासाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात नाविन्य होत असतांना राजकरणाची मलीनता मात्र दिवसागणित वाढतच चालली आहे.त्यामुळं देश सेवेचे महत्वपूर्ण मध्यम असलेल्या राजकारणाची सध्या अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे.राजकारण चांगल्या माणसाचे काम नाही इत पर्यंत म्हणायची मजल आता गेली आहे. खरे पाहता राजकारण म्हणजे शुद्ध समाजकारण आहे.समाजाची सेवा करण्याचे उत्तम मध्यम आहे. त्यामुळं मालिन झालेल्या राजकारणाचे शुद्धीकरण करणे आजच्या काळाची गरज आहे. शुद्धीकरण व्हावे असे केवळ बोलून चालणार नाही तर एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाने प्रत्यक्ष राजकारणात येऊन निष्काम भावनेतून केलेला विकास कसा होऊ शकतो हे सिद्ध करणे गरजेचे आहे.त्याचसाठी अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना राष्ट्रहितासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याचे यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने जाहीर करण्यात आले.भक्त परिवार निवडणूकी दरम्यान नियोजनबद्ध प्रचार करणार असल्याचे  यावेळी सांगण्यात आले.

राज्यभरातील जय बाबाजी परिवाराच्या वतीने नाशिकला नातेवाईक संपर्क अभियान – अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या  विजयासाठी राज्यभरातील भाविक नाशिक लोकसभा क्षेत्रात नातेवाईक संपर्क अभियान राबवत आहे.या संपर्क मोहिमेच्या माध्यमातून लाखो भाविक आपल्या नाशिक लोकसभा क्षेत्रातील नातेवाईकांना अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांची राष्ट्रहितासाठीची भूमिका समजावून सांगणार असून सत्पात्री मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.

COMMENTS