Homeताज्या बातम्यासंपादकीय

वाढते अपघात चिंताजनक

देशातील आजची परिस्थिती बघता, पायाभूत सोयी-सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, रस्ते आणि दळणवळणाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध

खडसेंची राजकीय गोची
शेतकर्‍यांची कोंडी
फुटीरवादी संघटनांवर चाप

देशातील आजची परिस्थिती बघता, पायाभूत सोयी-सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, रस्ते आणि दळणवळणाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र याचबरोबर अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही प्रमाणांत मानवी चुका, तर अनेक ठिकाणी रस्त्याबाबत झालेल्या यांत्रिक चुका, यामुळे अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. अपघातामध्ये मृत्यूमृखी पडणार्‍यांचा आकडा हा दरवर्षी अवाढव्य वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असून, याबाबत कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. सरकारी आकडेवारीचा विचार करता दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचा जीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, 18 ते 45 या वयोगटातील तरुण मृत्यूमूखी होण्याचे प्रमाण 69 टक्के आहे. एकट्या महाराष्ट्राची आकडेवारी 8 टक्के आहे. देशातील विधायक शक्ती अपघातात आपला जीव गमावतांना दिसून येत आहे. दहशतवादी हल्ले, इतर नैसर्गीक घटनांचा विचार करता, अपघातामुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यामुळे देशाच्या विकासावर देखील मोठा परिणाम होतांना दिसून येतो.
महाराष्ट्रातही मागील वर्षी म्हणजे 2021 साली जानेवारी ते नोव्हेंबर या काळात 26 हजार 284 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात.हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या 3.14% सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 70 टक्के लोक 18 ते 45 या वयोगटातील असतात, अशी माहिती खुद्द केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. अपघाताची ही आकडेवारी चिंतीत करणारी आहे. बरं अपघाताचे प्रमाण केवळ एका राज्यात नाही, तर संपूर्ण देशभरात दररोज शेकडो अपघात होता. त्यात शेकडो जणांचा मृत्यू होतो, आणि हळहळ व्यक्त करुन, या अपघाताकडे दुर्लक्ष केल्या जाते. मानवी चुका कमी करण्यासाठी, अनेक कायदे करण्यात आले. मात्र कायदा करून त्यावर अंमलबजावणी होत नसेल, तर त्या कायद्याचा काय उपयोग? वाहनचालकांना कडक शिस्त लावणे गरजेचे आहे. कारण रस्त्यावर वाहनांची गर्दी असली तरी आपले वाहन जबरदस्तीने पुढे नेण्याच्या प्रयत्नात नेहमीच छोटे अपघात होतच असतात. तर कधी रात्रीच्या वेळी ट्रक, तसेच मोठ-मोठे सामान वाहतूक करणार्या गाडया बेदरकारकपणे चालवल्या जातात. तर बर्याचवेळेस या चालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवतांना दिसून आले आहे. त्याचप्रकारे रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, धोक्यांच्या फलकांची उणीव, रात्री रस्त्याच्या पट्ट्याच न दिसणे, प्रखर दिव्यांचा वापर अशी अनेक कारणे आहेत. रस्ते चांगले झाल्याचा परिणामही काही ठिकाणी अपघात वाढण्यात झाला आहे. धोकादायक वळणे कमी करण्याचा प्रयत्न रस्ते बांधकाम विभागाने केलेला नाही. त्यामुळेही अपघात वाढतात. रस्त्यांवर किती वेगाने वाहन चालविले पाहिजे, याची नियमावली असताना ती कुणीच पाळत नाही. अति घाई संकटात नेई, असा अनुभव पदोपदी येत असूनही त्यातून कुणी काही धडा घेत आहे, असे दिसत नाही. त्यामुळे अपघातात मृत्यू होणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. याला लगाम घालण्यासाठी वेगाला नव्हे तर, जीवाचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. शिवाय शासनस्तरावर देखील कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. 

COMMENTS